या कारणामुळे शाहरुख खानवर भडकली होती फराह खान, सर्वांसमोर मागायला लावली होती माफी !

By Viraltm Team

Published on:

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा संस्मरणीय चित्रपट ओम शांती ओमला रिलीज होऊन १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातून फराह खानने डायरेक्टर म्हणून आणि दीपिका पादुकोणने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. चित्रपटाला दर्शकांकडून खूपच प्रेम मिळाले होते. चित्रपटामध्ये पप्पू मास्टरची भूमिका साकारणाऱ्या श्रेयस तळपदेने शुटींगच्या दिवसांची आठवण काढताना एक मजेदार किस्सा सांगितला. या कारणामुळे शाहरुखवर भडकली होती फराह.

एका मुलाखती दरम्यान श्रेयस तळपदेने सेटवर झालेल्या एका घटनेचा उल्लेख करताना सांगितले कि किंग ऑफ रोमांस शाहरुख खान शुटींगच्या पहिल्या दिवशी उशिरा आला होता, ज्यामुळे फराह खान त्याच्यावर खूपच नाराज झाली होती. इतकेच नाही तर फराह खानने शाहरुखला सर्वांच्या समोर चांगलेच फटकारले होते आणि म्हंटले होते कि ती त्याच्यावर खूपच नाराज आहे कारण त्याने खूपच वाट पाहायला लावली. नंतर शाहरुखने फराह आणि तिथे उपस्थित असलेल्या संपूर्ण टीमची माफी मागितली होती.श्रेयस नुसार मला चांगले आठवते कि तो उशिरा १० वाजता आला होता आणि फराह खूपच नाराज झाली होती. फराहने शाहरुख खानला म्हंटले कि संपूर्ण टीम तुझी वाट पाहत आहे. तथापि शाहरुखने म्हंटले होते कि सकाळी तुम्ही सर्व १० वाजता या आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी ९ वाजता पोहोचेन आणि १० वाजेपर्यंत रेडी होईन आणि नंतर आपण शुटींग सुरु करूया.

शुटींगच्या दिवसांना आठवताना श्रेयसने म्हंटले कि जेव्हा संपूर्ण टीमला माहिती झाले कि दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस आहे तेव्हा त्यांनी मेकअप रूमला फुगे आणि रिबनने सजवले होते. श्रेयस नुसार मला आज देखील आठवते कि मी संपूर्ण टीमसोबत केक कापला होता आणि हा माझ्या लाईफमध्ये स्पेशल बर्थडे होता. श्रेयस नुसार हा चित्रपट माझ्यासाठी खूपच खास आहे कारण हा शाहरुख आणि फराह खानसोबत माझा पहिला प्रोजेक्ट होता. त्याने म्हंटले कि तो पप्पू मास्टरची भूमिका साकारण्यासाठी स्वतःला खूप भाग्यवान समजतो ज्याला आजदेखील दर्शकांकडून पसंती दिली जाते.चित्रपटामध्ये एक सीन आहे जिथे ओम (शाहरुख खान) शांति प्रिया (दीपिका पादुकोण)ला आगीतून वाचवतो. या सीनची आइडिया मदर इंडिया चित्रपटामधून घेतली गेली होती, ज्यामध्ये सुनील दत्त साहेबांनी नरगिसला आगीतून वाचवले होते. तर चित्रपटामध्ये एक सीन आहे जिथे अभिनेता वाघासोबत लढाई करत आहे. या सीनमध्ये नकली वाघाचा वापर केला गेला होता आणि हि आइडिया फराहला तिचा भाऊ साजिदने दिली होती.फराह खान दीपिका पादुकोणच्या स्क्रीन टेस्टवर खुश नव्हती. त्याचबरोबर तिचे असे मानणे होते कि दीपिकाचे उच्चार व्यवस्थित नाहीत. पण फराहने दीपिकाला असे असून देखील चित्रपटामध्ये कास्ट केले कारण ती तिच्या सुंदरतेवर खूप खुश झाली होती. चित्रपटामध्ये अर्जुन रामपालने भूमिका करण्यास नकार दिला होता कारण त्याला वाटले होते कि त्याची भूमिका जास्तच वाईट आहे. तथापि नंतर शाहरुख द्वारे समजावल्यानंतर अर्जुन रामपालने हि भूमिका साकारली. शाहरुख खानने बाथरूममध्ये बसून अर्जुन रामपालला या भूमिकेसाठी तयार केले होते.

Leave a Comment