हे पदार्थ खाल्ल्यानंतर चुकुनही पिऊ नका पाणी, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम !

By Viraltm Team

Published on:

शरीराची सर्वात मोठी गरज प्राणवायू असतो आणि दुसरी सर्वात मोठी गरज पाणी आहे. पाण्याविना जीवनाची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. आरोग्य तज्ञ एका दिवसामध्ये ६ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण तहान भागवण्याशिवाय देखील शरीरामध्ये पाण्याची गरज असते, ज्याची पूर्ती आवश्यक असते. यामुळे कमीत कमी ६ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

पण हे देखील खरे आहे कि प्रत्येक शरीरासाठी पाण्याची आवश्यकता वेगळी असते, अशामध्ये शक्य तितके जास्त पाणी प्यावे. काहीही खाल्ल्यानंतर पाण्याची आवश्यकता भासते, काही वस्तू अशा असतात ज्यांच्या सेवनानंतर पाणी पिऊ नये, अन्यथा आरोग्या संबंधी समस्या वाढू शकतात. अशामध्ये आज आम्ही यासंबंधी महत्वपूर्ण माहिती देणार आहोत.

भाजलेले चणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पोटदुखीची समस्या होऊ शकते. कारण चणे पचवण्यासाठी पाचकाग्नि किंवा जठराग्निची आवश्यकता असते. अशामध्ये पाणी पिल्यास अग्नी शांत होतो आणि चणे व्यवस्थित पचत नाहीत आणि यामुळे पोटदुखी समस्या जाणवते.

पेरूला चटणी मीठ लावून खाण्याची मजाच वेगळी आहे. पण मिठासोबत पेरू खाल्ल्यानंतर कधीच पाणी पिऊ नये. अन्यथा गॅस सोबत पोटदुखीची समस्या देखील होऊ शकते. असे पेरूच्या बियांमुळे होते कारण पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने बिया पचत नाहीत आणि त्यामुळे पोटदुखी होते.

आइसक्रीम तर सर्वांचे फेवरेट असते. पण आइसक्रीम खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने गळा खराब होणे आणि दातांमध्ये सनक येण्याची समस्या होऊ शकते. यामुळे आइसक्रीम खाल्ल्यानंतर १० मिनिटाने पाणी प्यावे.

चहा किंवा कॉफी पिल्यानंतर लगेच पाणी पिण्याची तलप येते, असे जिभेवर असलेल्या टेस्ट बड्समुळे होते. ज्यांमुळे चहा सारख्या गरम लिक्विड नंतर शीतलतासाठी पाणी पिण्याची आवश्यकता भासते. पण चहा किंवा कॉफी पिल्यानंतर लगेच पाणी पिल्याने पोट खराब होते, पोट जड होणे आणि दातांमध्ये सनक येणे अशा समस्या होऊ लागतात. यामुळे चहा पिल्यानंतर २५ मिनिटांनी पाणी प्यावे.

फळांच्या सेवनानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण फळांमध्ये अॅठसिड आणि शुगर कंटेंट असते. गोड फळांच्या सेवनानंतर पाणी पिल्याने अपचन, खोकला किंवा शुगर वाढण्याचा धोका असतो, तर आंबट फळे खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने गळ्यामध्ये वेदना किंवा खवखव अशा समस्या होऊ शकतात.

तसे तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कि लिंबू पाणी पिणे आणि लिंबू चाटणे हे दोन्ही शरीरामध्ये वेगवेगळी प्रतिक्रिया करतात. तर आवळा खाल्ल्यानंतर पाणी पिले जाऊ शकते कारण आवळा आंबट नाही तर तुरट असतो आणि हे फळ आणि भाजी दोन्ही प्रकारामध्ये येते.

शेंगदाणे गरम स्वभावाचे असतात, यामुळे यासोबत पाणी पिण्याचे मन करते. गरम स्वभावामुळे तोंड सुखते पण याच्या सेवनानंतर लगेच पाणी पिल्याने खोकल्याची समस्या होऊ शकते. याशिवाय मिठाई आणि मैद्यापासून बनलेले शुगर युक्त पदार्थ खाल्ल्यानंतर देखील पाणी पिऊ नये.

Leave a Comment