जाणून घ्या कोण होती गंगूबाई काठियावाड़ी? पोस्टरमध्ये दिसला आलियाचा दमदार लुक !

By Viraltm Team

Updated on:

बॉलीवूडच्या दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर मंगळवारी प्रदर्शित केले. सध्या सोशल मिडियावर हे पोस्टर तुफान व्हायरल झाले आहे. या चित्रपटामध्ये आलीय भट्ट गंगुबाईच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे नाव पाहिल्यानंतर आपल्याला असा प्रश्न पडतो कि हि गंगुबाई काठियावाडी कोण आहे? चला तर मग जाणून घेऊयात.

आलीय भट्ट संजय लीला भन्साळीसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. यापूर्वी भन्साळी आलिया भट्ट आणि सलमान खानला घेऊन इंशाअल्लाह ची योजना आखत होता, पण काही कारणामुळे सलमानने या चित्रपटातून माघार घेतली, ज्यामुळे हा चित्रपट मागे पडला. त्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची घोषणा केली.लेखक एस हुसैन जैदीचे पुस्तक माफिया क्वीन्स ऑफ मुंबईच्या नुसार गंगूबाई गुजरातच्या कठियावाड़ भागामधील रहिवासी होती. ज्यामुळे तिला गंगूबाई काठियावाडी असे म्हंटले जात होते. लहान वयामध्ये गंगूबाईला वे’श्या’व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर एक कुख्यात गुन्हेगार गंगुबाईचा ग्राहक झाला. गंगूबाई मुंबईच्या कामाठीपुरा भागामध्ये कोठा चालवीत होती. तिथेच गंगूबाईने से’क्स’वर्कर्स आणि अनाथ मुलांसाठी बरीच कामे देखील केली आहेत.

गंगूबाई काठियावाडीचे खरे नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. गंगुबाईला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते. अवघ्या १६ व्या वर्षी तिच्या वडिलांच्या अकाऊंटंटंसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले आणि लग्न करून ती मुंबईला पळून आली. मोठी मोठी स्वप्ने पाहणाऱ्या गंगूबाईला स्वप्नातदेखील वाटले नव्हते कि तिचा पती तिला धोका देऊन फक्त पाचशे रुपयांमध्ये तिला कोठ्यावर विकेल.एस हुसैन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकामध्ये डॉन करीम लालाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकातील नोंदीनुसार लालाच्या टोळीने गंगुबाईवर ब’ला’त्का’र केला होता. त्यानंतर न्याय मागण्यासाठी गंगूबाईने करीम लालाची भेट घेतली आणि त्याला राखी बांधून आपला भाऊ बनवले. करीम लालाची बहिण असल्यामुळे कामाठीपुराचा सर्व भाग गंगुबाईच्या हातामध्ये आला. असे म्हंटले जाते कि गंगुबाई कोणत्याही मुलीच्या संमतीशिवाय तिला कोठ्यावर ठेऊन घेत नव्हती.आलीय भट्टच्या करियरबद्दल बोलायचे झाले तर करण जौहरच्या कलंक या चित्रपटामध्ये ती आपल्याला शेवटची पाहायला मिळाली होती. हा चित्रपट फ्लॉप झाला होता. त्याआधी ती रणवीर सिंहसोबत गली बॉय या चित्रपटामध्ये दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि आलिया-रणवीरने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.

Leave a Comment