बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही अभिनेत्रींनी आपल्या चित्रपटातील हिरो बरोबर लग्न केले आहे. तर काही अभिनेत्रींनी बिझनेस मॅन किंवा क्रिकेटर सोबत लग्न करून आपला संसार बसवला आहे. आज आम्ही तुम्हाला काही असे अभिनेत्री विषयी सांगणार आहोत की ज्यांनी चित्रपटामध्ये खतरनाक विलनची भूमिका केलेली असून त्या विलन सोबत लग्न केले आहे. चला जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल.
१) रेणुका शहाणे :- “हम आपके है कौन” या सुपरहिट चित्रपटात रेणुका शहाणे यांनी काम केले आहे.या चित्रपटांमध्ये रेणुका शहाणे यांची भूमिका खूपच गाजली होती. रेणुका शहाणे यांनी सन 2001 मध्ये आशुतोष राणा सोबत लग्न केले. आशुतोष राणा यांनी दुश्मन, संघर्ष, बादल अशा अनेक चित्रपटात विलनच काम केले आहे.२) पूजा बत्रा :- 1990 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री पैकी पूजा बत्राला फिल्म जगत मध्ये मानल जात असे.नाव लौकिक असलेले विलन नवाब शहा यांच्यासोबत काही काळ रिलेशन मध्ये राहिल्यानंतर पूजा बत्राने त्याच्यासोबत लग्न केले.नवाब शहा ने “टायगर जिंदा है” डॉन २ आणि साऊथ मधील चित्रपटात अविस्मरणीय अशा खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत.
३) पोनी वर्मा :- पोनी वर्मा ही खूपच सुप्रसिद्ध अशी कोरिओग्राफर आहे. पोनी वर्माने साउथ फिल्म मध्ये तसेच बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध असे विलन प्रकाश राज यांच्यासोबत सन 2010 मध्ये लग्न केले. प्रकाश राज ने “सिंघम”, “वांटेड”, दबंग २ सहित अनेक बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांमध्ये अविस्मरणीय अशी विलनची भूमिका निभावली आहे.
४) निवेदिता भट्टाचार्य :- अभिनेत्री निवेदिता भट्टाचार्य बॉलिवूड अभिनेता के के मेनन सोबत लग्न केल आहे. बॉलिवूडमधील खूप चित्रपटांमध्ये के के मेनन ने विलनची भूमिका साकारली आहे.
५) कृतिका सेंगर :- “राणी लक्ष्मीबाई” आणि “कसम तेरे प्यार की” अशा अशा अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम करणारी टीव्ही ॲक्ट्रेस कृतिका सिंगर आहे. कृतिका सेंगर ने दिग्दर्शक पंकज धीर यांचा मुलगा निकितन धीर सोबत 2014 मध्ये लग्न केल आहे. निकेतन धीरने ” मिशन इस्तांबुल” “चेन्नई एक्सप्रेस” “दबंग २” रेडी अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये विलनची भूमिका साकारली आहे.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.