वेळ आणि लाईफस्टाईल लोकांचे खूप वेगाने आयुष्य बदलत आहे आणि या बदलत्या लाईफस्टाईलने लोकांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम झाला आहे. अशामध्ये बहुतेक लोकांना पोटासंबंधी समस्या होते आणि यामध्ये तर अॅसिडिटी तर सर्वात मोठी समस्या आहे.

अशामध्ये अनेक लोकांचे पोट सकाळी सकाळी साफ होत नाही तर अशा लोकांसाठी एक खूपच साधारण उपाय आहे जो खूपच प्रभावी सिद्ध होऊ शकतो. यासाठी आयुर्वेदामध्ये खूपच खास चूर्ण सांगितले गेले आहे ज्याला त्रिफळा चूर्ण म्हंटले जाते. त्रिफळा बनवण्यासाठी तीन वस्तूंची गरज पडते.

पहिले आवळा, दुसरे हरड आणि तिसरे बेहडा. हे साहित्य तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज मिळेल. या तिन्ही वस्तू समान मात्रामध्ये एकत्र करून चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या. जर तुमच्याकडे इतका वेळ नसेल तर याचे चूर्ण देखील बाजारामध्ये उपलब्ध आहे.

हे चूर्ण रात्री जेवण केल्यानंतर जवळ जवळ २ तासानंतर आणि झोपण्याच्या ठीक अगोदर कोमट पाण्यासोबत घ्या. तुम्हाला यासाठी जवळजवळ १० ग्रॅम इतकी मात्रा घ्यावी लागेल. जी एका व्यक्तीसाठी पुरेशी आहे. जर तुम्ही तीन किंवा चार दिवस सतत हे चूर्ण सेवन केले तर तुम्हा जाणवू लागेल कि हे चूर्ण आपल्या पोटामध्ये सफाई करण्याचे काम करत आहे.

ज्यामुळे सकाळी सकाळी तुमचे पोट सहजपणे साफ होईल आणि एक साफ पोट अनेक आजारांपासून आपल्याला वाचवण्याचे काम करते. जर तुम्हाला पोटाची समस्या होऊ नये असे वाटत असेल तर ५ ते ७ दिवस त्रिफळा चूर्ण घेणे खूपच फायदेशीर ठरते आणि हे आपल्याला अनेक समस्यांपासून वाचवण्याचे काम करते.